१९८० नंतर खेडे झपाट्याने बदलत जाऊ लागले, जागतिकीकरणाचे प्रत्यक्ष परिणाम गावगाड्यावर झाले. शेती या मुख्य व्यवसायावर संकट कोसळले. शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली. राजकारणामुळे ग्रामीण माणसाची मानसिकता बदलून गेली. त्याची मुल्ये बदलली या ग्रामीण विश्वाचे आणि ग्रामीण माणसाचे झालेले आंतर्बाह्य परिवर्तन मराठी कथेतून टिपण्याची गरज होती ते सचिन वसंत पाटील यांनी ‘सांगावा’ या पहिल्याच कथासंग्रहातून टिपत साहित्य क्षेत्रात पदार्पन केले.
ग्रामीण जीवनाचे उभे आडवे ताणेबाणे प्रथमच त्यातील छेदाभेदासकट विस्तृत प्रमाणात कथेच्या रुपाने त्यांनी साकारले आहेत. त्यांच्या कथेत कणखर सकसता, आजच्या आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत, बदलत्या वास्तवाचे भान, सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्यावरही क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता, दैनंदिन जीवनातील शासंक भीती, यांत्रीक जीवनातील कृत्रीमता, संस्काराची न पुसली जाणारी वलये, वास्तवाची निदान करणारी शोधदृष्टी आणि तरल भावस्पर्शी संवेदनांची वीण आहे. त्यामुळे ‘सांगावा’ म्हणजे समकालीन ग्रामीण साहित्यामध्ये मोलाचा ठेवा ठरावा अशी कलाकृती आहे.
सचिन पाटील एका सामान्य कुटूंबात जन्माला आले, शिक्षण आणि विदग्ध साहित्य यांची कुठलीही पूर्वपरंपरा नसतानाही जिद्द आणि अथक परिश्रमाने त्यांनी आपली लेखणी चालवली. त्यातूनच कथा साकारत गेली. ती समर्थ आहे भविष्यात ती सशक्त होईल असा विश्वास वाटतो. त्यांच्या भविष्यकालीन लेखणास मन:पूर्वक शुभेच्छा..!
(महाराष्ट्र साहित्य परिषद लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०११)
– प्रा.राजा माळगी, मराठी विभाग प्रमुख,
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर.
Keywords : Sangava ǀ Sachin Patil ǀ Tejshri Prakashan ǀ Marathi Katha Sangrah ǀ Marathi Story ǀ Marathi Katha ǀ Marathi Katha Lekhan ǀ Marathi katha books ǀ best marathi katha ǀ Gramin Marathi Katha ǀ Gramin Katha



















1 review for सांगावा | Sangava
Write a customer review